उजळाईवाडी (ता. करवीर) येथील श्री सरस्वती मंगल कार्यालयामधील निवारागृहातील कम्युनिटी किचनमध्ये रोज ३६ जणांचे जेवण आणि नाष्टा करण्यात येतो. दोनवेळा अगदी घरच्या सारखे जेवण, नाष्टा मिळतो. आमचं पोट भरतंय, पण कुटुंबाच्या काळजीने जीव व्याकुळ होत आहे. आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरी जाण्याची सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी या निवारागृहातील व्यक्तींकडून करण्यात आली.
कम्युनिटी किचनमध्ये रोज ३६ जणांचे जेवण
